Sunday, 23 April 2017

shree manache shlok



।। श्री मनाचे श्लोक ।।







।। जय जय रघुवीर समर्थ ।।


।। श्री राम ।।


गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ||
नमू शारदा मूळ चत्वार वाचा |
      गमू पंथ आनंत या राघवाचा  ।।१।।

मना सज्जना भक्तिपंतेंची जावे |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||
जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |
     जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।।२।।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा ||
सदाचार हा थोर सांडू नये तो |
     जनीं तो चि तो मानवी धन्य होतो ।।३।।

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ||
मना सर्वथा निती सोडू नको हो |
      मना अंतरी सार विचार राहो ।।४।।

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा |
मना सत्यसंकल्प जीवी धरावा ||
मना कल्पना ते नको वीषयांची |
     विकारे घडे हो जनी सर्व ची ची ।।५।।

नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
     नको रे मना मत्सरू दंभ भारू ।।६।।

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नित्य सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
     मना सर्व लोकांसी रे नीववावे ।।७।।
  
देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेचि क्रिया धरावी
मना चंदनाचेपरी त्वा झिजावे
     परी अंतरी सज्जना नीववावे ।।८।।

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थबुद्धी रे पाप सांचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
      होता मनासारिखे दुःख मोठे ।।९।।

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी
सुखाची स्वये सांडि जीवी करावी
देहेदुःख हे सुख मानीत जावे
       विवेके सदा सस्वरूपी भरावे ।।१०।।


जनीं सर्व सुखी असा कोण आहे
विचारे मना तूंचि शोधूनि पाहे
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
       तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ।।११।।


मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहबुद्धि सोडूनि द्यावी
       विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।।१२।।


मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं
       बळे लागला काळ हा पाठिलागी ।।१३।।


जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला
परी शेवटी काळ घेवोनि गेला
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले
      कितीएक ते जन्मले आणि मेले ।।१४।।


मना पाहता सत्य हे मृत्युभूमी
जिता बोलती सर्वही जीव मी मी
चिरंजीव हे सर्वही मानिताती
      अकस्मात सांडूनियां सर्व जाती ।।१५।।


मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
पुरेना जनी  लोभ रे क्षोभ त्याते 
      म्हणोनी जनी मागुता जन्म घेते ।।१६।।


मनी मानव व्यर्थ चिंता वहाते
अकस्मात होणार होऊनि जाते
घडे भोगणे सर्वहि कर्मयोगे
       मतीमंद ते खेद मानी वियोगे ।।१७।।

मना राघवेवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ती तू रे 
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
      तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ।।१८।।

 मना सर्वथा सत्य सांडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावे
      मना मिथ्य ते मिथ्य सो डूनि द्यावे ।।१९।।

बहू हिंपुटी होईजे मायपोटी
नको रे मना यातना तेचि मोठी
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी
      अधो मुख रे दुःख त्या बाळकासी ।।२०।।
  
 मना वासना चुकवी येरझारा
मना कामना सांडि  रे द्रव्यदारा
मना यातना थोर हे गर्भवासी
       मना सज्जना भेटवी राघवासी ।।२१।।


 मना सज्जना हीत माझे करावे
रघूनायका दृढ चित्ती धरावे
महाराज तो स्वामि  वायुसुताचा
      जाना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ।।२२।।

बोले मना राघवेवीण काही
जनी वाउगे बोलता सुख नाही
घडीने घडी काळ आयुष्य नेतो
       देहांती तुला कोण सोडू पहातो ।।२३।।


रघूनायकावीण वाया शिणावे
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे
सदासर्वदा नाम वाचे वासो दे
      अहंता मनी पापिणी ते नसो दे ।।२४।।


मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा
सुखाची घडी लोटता सूख आहे
      पुढे सर्व जाईल काही राहे ।।२५।।

देहेरक्षणाकारणे यत्न केला
परी शेवटी काळ घेऊनि गेला
करी रे मना भक्ति या राघवाची
      पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ।।२६।।


भवाच्या भये काय भीतोस लंडी
धरी रे मना धीर धाकासी सांडी
रघूनायकासारिखा स्वामि शीरी
       नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।

दीनानाथ हा राम कोदंडधारी
पुढे देखता काळ पोटी थरारी
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी
      नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।२८।।
  
 पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे
बळे भक्तरीपूशिरी कांबी वाजे
पुरी वाहिली सर्व जेणे विमानी
       नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।२९।।

समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे
जयाची लीला वर्णिता लोक तीन्ही
       नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३०।। 


महासंकटी सोडिले देव जेणे
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३१।।

अहल्या शिळा राघवें मुक्त केली
पदी लागता दिव्य होऊनि गेली
जया वर्णितां शिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३२।।

वसे मेरूमंदार हे सृष्टीलीळा
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा
चिरंजीव केले जणी दास दोन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३३।।

उपेक्षा कदा रामरूपी असेना
जीवां मानावां निश्चयो तो वसेना
शिरी भार वाहेन बोले पुराणीं
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३४।।

असे हो जया अंतरी भाव जैसा
वसे हो तया अंतरी देव तैसा
अनन्यासी रक्षीतसे चापपाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३५।।

सदा सर्वदा देव सन्निध आहे
कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे
सुखानंद आनंद कैवल्यदानी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३६।।

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा
उडी घालितो संकटी स्वामी तैसा
हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३७।।

मना प्रार्थना तुजला एक आहे
रघुराज थक्कीत होऊन पाहे
अवज्ञा कदा हो यादर्थी न कीजे
मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।।३८।।

जया  वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
जयाचेनि योगे समाधान बाणे
तयालागी हे सर्व चांचल्य दीजे
मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।।३९।।

मना पाविजे सर्वही सूख जेथे
अति आदरे ठेविजे लक्ष तेथे
विवेके कुडी कल्पना पालटीजे
मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।।४०।।

बहू हिंडता सौख्य होणार नाही
शिणावे परी नातुडे हीत कांही
विचारे बरे अंतरा बोधवीजे
मना सज्जना राघवी वस्ती कीजे  ।।४१।।

बहुतांपरी हेचि आता धरावे
रघूनायका आपुलेसे करावे
दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे
मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।।४२।।


मना सज्जना एक जीवी धरावे
जणी आपुले हीत तूवां करावे
रघूनायकावीण बोलो नको हो
सदा मानसी तो निजध्यास राहो ।।४३।।

मना रे जणी मौनमुद्रा धरावी
कथा आदरे राघवाची करावी
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे
सुखालागी आरण्य सेवीत जावे ।।४४।।

जयाचेनि संगे समाधान भंगे
अहंता अकस्मात येऊनि लागे
तये संगतीची जणी कोण गोडी
जिये संगतीने मती राम सोडी ।।४५।।

मना जे घडी राघवेवीण गेली
जनीं आपुली ते तुवां हानि केली
रघूनायकावीण तो शीन आहे
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ।।४६।।
  
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे
जणी जाणता भक्त होऊनि राहे
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।४७।।

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा
सदा रामनामे वदे नित्य वाचा
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।४८।।

सदा बोलण्यासारिखे चालताहे
अनेकी सदा एक देवासि पाहे
सगूणीं भजे लेश नाही भ्रमाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।४९।।

नसे अंतरी कामकारी विकारी
उदासीन जो तापसी ब्रम्हाचारी
निवाला मनीं लेश नाही तमाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।५०।।

मदें मत्सरे सांडिला स्वार्थबुद्धी
प्रापंचिक नाहीं जयातें उपाधी
सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।५१।।

क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे
न लिंपे कदा दंभ वादे विवादें
करी सुखसंवाद  जो उगमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।५२।।

सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा
जगी धन्य यो दास सर्वोत्तमाचा ।।५३।।

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।५४।।

नसे मानसी नष्ट आशा दुराशा
वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।५५।।

दीनाचा दयाळू मनाचा मवाळू
स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू
तया अंतरी क्रोध संताप कैचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।५६।।

जागी होईजे धन्य या रामनामे
क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे
उदासीनता तत्त्वता सार आहे
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे ।।५७।।

नको वासना विषयी वृत्तिरूपे
पदार्थे जडे कामना पूर्वपापे
सदा राम निष्काम चिंतीत जावा
मना कल्पनालेश तो हि नसावा ।।५८।।

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी
नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी
मणी कामना राम नाही जायला
अति आदरे प्रीती नाही तयाला ।।५९।।

मना राम कल्पतरू कामधेनू
निधी सार चिंतामणी काय वानू
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता
तया साम्यता काय सी कोण आता ।।६०।।

उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे
तया अंतरी सर्वदा तेचि राहे
जनी सज्जनीं वाद हा वाढवावा
पुढे मागुता शोक जीवी धरावा ।।६१।।

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला
बळे अंतरी शोक संताप ठेला
सुखानंद आनंद भेंदे बुडाला
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला ।।६२।।

घरी कामधेनू पुढे ताक मागे
हरीबोध सांडूनि विवाद लागे
करी सार चिंतामणी काचखंडे
तया मागता देत आहे उदंडे ।।६३।। 
  
अती मूढ त्या दृढ  बुद्धी असेना
अति काम त्या राम  चित्ती वसेना
अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा
अति विषयी सर्वदा दैन्यवाणा ।।६४।।

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे
अति मुर्ख त्या सर्वदा दुःख दुणे
धरी रे मना आदरे प्रीती रामी
नको वासना हेमधामी विरामी ।।६५।।

नव्हे सार संसार हा घोर आहे
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे
जणी विष खाता पुढे सुख कैचे
करी रे मना ध्यान या राघवाचे ।।६६।।

घनश्याम हा राम लावण्यरूपी
महाधीर गंभीर  पूर्णप्रतापी
करी संकटी सेवकाचा कुडावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।। 

बळे आगळा राम कोदंडधारी
महाकाळ विक्राळ तो हि थरारी
पुढे मानवा किंकरा कोण केवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।\

सुखानंदकारी निवारी भयाते
जानी भक्तीभावे भाजावे तयाते
विवेके त्यजावा अनाचार हेवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।।

 सदा रामनामे वदा पूर्णकामे
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।।


1 comment:

  1. https://manobodh-arth.blogspot.com/2020/11/blog-post.html

    please comment on this if you like this...i took inspiration from your blog and started by own...pelase check and reply

    ReplyDelete